Tuesday, March 21, 2023

संप - काय गमावले ?काय कमावले ?

 









( जुनी पेन्शन योजना लागू करावी ही बाब आम्ही तत्त्व म्हणून स्वीकारत आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा  सुरु सात दिवसांपासूनचा ( दि.१४ ते २० मार्च २०२३) संप मागे घेतला. सर्व कर्मचारी मंगळवार २१ पासून कामावर रुजू झाले. संप मागे घेण्यात आला असला तरी जुन्या पेन्शनचा प्रश्न मात्र कायमच आहे. कारण ही योजना तत्काळ लागू करण्याचा कोणताही निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही.मुख्यमंत्री शिंदे यांनी संपकरी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेत्यांशी सोमवारी दुपारी विधानभवनातील त्यांच्या दालनात चर्चा केली. जुन्या पेन्शनच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी तीन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती राज्य सरकारने नेमली होती, पण अशा समितीचा प्रस्ताव संपकरी संघटनांनी आधी धुडकावून लावला होता.तथापि, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव संघटनांनी स्वीकारला. समिती तीन महिन्यांत राज्य सरकारला अहवाल देईल. या समितीसमोर संपकरी संघटना त्यांची बाजूही मांडणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केल्याची आधी घोषणा करा, तरच संप मागे घेऊ ही भूमिका मवाळ करत संपकरी संघटनांनी समितीचा पर्याय स्वीकारला आहे.मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव बैठकीला उपस्थित होते. १४ मार्चपासून राज्यातील 'क' आणि 'ड' वर्ग कर्मचारी संपावर होते आणि त्यांनी अभूतपूर्व एकी दाखविली. सरकारी कामकाज अनेक ठिकाणी कोलमडले होते.एकूणच या संपात संपकऱ्यांनी काय कमावले? काय गमावले ?.....

==================================

( कविता थोडी परखड आहे पण सत्य आहे ! )


संपात आपण  काय कमावले?

नेमक  आपण काय गमावले ?



सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच बळ समजले ,

एकीत मोठ बळ असत , हेही समजले.

काहींचा धीर खचला ,काहींना धीर आला.

संघटनांच्या म्होरक्यांचा , खरा चेहराही दिसला.



अनेकांचे निरनिराळे, रागरंग दिसले.

मधेच रणातून पळणारे नेतेही दिसले.

तसेच आपल्याच नेत्यानवर हसणारे ,चेलेही दिसले.

खरे किती ? खोटे किती तेसुद्धा समजले.



अभ्यास नसूनही बेधडक बोलणारे होते ,

तसे अभ्यासपूर्ण मुद्दे मांडणारे काही चेहरेही होते.

हजेरीवरती सह्या करुन , संपात घोषणा देणारे होते.

तसे आर नाही तर पार म्हणून लढणारे लढवय्ये होते.



याच संपात ठिकठिकाणी महाभारतही घडले.

संपकऱ्यांना संपात , कुठे द्रौणाचार्य दिसले.

कुठे एकलव्य सुद्धा ,दृष्टीस पडले.

कुठे -कुठे कौरव होते ,तसे अभिमन्युही होते.



आपण सांगतो ,तेच आहे खरे .

असे सांगणारे , राजकर्ते होते .

तसेच संप करणारे , संपकर्तेही होते.

संपावरती गरळ ओकणारे ,लोकही दिसत होते.



संप होता , संप झाला आणि तो मिटलाही.

मिटलेल्या संपाचे श्रेय घेणारा वर्गही दिसला.

खचू नका ,पुन्हा लढू म्हणणारा संपकरी दिसला.

नेत्यांच्या भूमिकेवर कटू बोलणाराही  दिसला.

तसा नेत्यांच्या सुरात सुर ,मिसळणारा  दिसला.



कुठे अवकाळीचा पंचनामा थांबला ,
आरोग्य सेवेविना सामान्य भांबावला.
अशा साऱ्या  प्रश्नांचाच आलेख तयार झाला. 
शेवटी ठोस उत्तराविनाच संप मिटला
.


सप्तदिनाच्या या संपात साऱ्या ,

कुणाला काय स्वर गवसले ?

हे ज्याचे त्याला नक्की समजले.

संपामद्ये आपण आपल्या ,

खरचं काय कमावले ? आणि नेमक काय गमावले ?

नक्कीच ज्याच त्याला समजले.

 

- धनाजी माने .....✍️




No comments:

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...