मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्रात लेखन,निवेदनशैली या दोन्ही अंगांनी प्रभाव टाकणारी काही मोठी नावं समोर येतात.
यामध्ये पु.लं .देशपांडे. ,व.पु.काळे. ,ग.आ. कुलकर्णी ,मतकरी-धारप,शंकर पाटील,आप्पासाहेब खोत अशा दिग्गजांनी हे क्षेत्र विविध अंगांनी आणि रंगांनी समृद्ध केले.
असेच एक नव्यापिढीतील नाव समोर येत
बाबासाहेब परीट .
बाबासाहेब परीट हे ग्रामीण कथाकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. आतापर्यंत सात मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्याची आणि कथा सादर करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. त्यांनी स्वतःच लिहिलेल्या कथा सादर केल्या आहेत व त्या गाजल्याही आहेत. त्यांची 'शिकार ' ही कथा चांगलीच गाजली आहे.
सिंगापूर येथे झालेल्या तिसऱ्या विश्व साहित्य संमेलनाम ध्येही सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली होती. दोन वेळा दिल्ली येथे झालेल्या साहित्य अकादमीच्या संमेलनातही त्यांना संधी मि ळाली होती. गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनात शिकार कथा सादर केली होती. यावर्षी सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित केले होते. त्यांनी गस्त ही कथा सादर केली.त्यांच्या कथांमधून वारणा खोऱ्यातील ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडते.
बाबासाहेब परीट हे केवळ एक प्राथमिक शिक्षक नसून ते कथालेखक व ग्रामीण साहित्याचे अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील साहित्य परंपरा आणि जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाला आहे. शिक्षक वर्गाची मान अभिमानाने उंचावली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षक, अधिकारी व कर्मचारी कथाकथन स्पर्धेत शिराळा तालुक्यातील बिळाशीचे सुपुत्र, जिल्हा परिषद शाळा, धसवाडीचे उपक्रमशील शिक्षक, ख्यातनाम ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी कथेचे बहारदार सादरीकरण केले. त्यांनी प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
यावेळी त्यांनी स्वलिखित 'गस्त' ही कथा उत्तमरित्या सादर केली. सामाजिक व्यंगावर भाष्य करून जीवनाची मूलभूत तत्वे त्यांनी आपल्या कथेतून मांडली आणि उपस्थितांची मने जिंकली.
महाराष्ट्रातून सुमारे चाळीसहून अधिक अधिकारी, कर्मचारी व शिक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धा तालुकास्तर, केंद्र, जिल्हा, विभाग व नंतर राज्यस्तरावरील अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे घेण्यात आल्या.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. गडचिरोली येथे ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातून निवडक कथाकारांनी यात सहभाग नोंदवला होता. परीट यांनी आपल्या कथेतून ग्रामीण जीवनाचा अस्सल गाभा, लोकसंस्कृतीची ताकद आणि समाजात दडलेली संवेदनशीलता यांचे अत्यंत प्रभावी चित्रण केले. त्यांच्या शब्दांनी आणि सादरीकरणाच्या शैलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
श्री. परीट यांच्या यशाबद्दल सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील, भारत सरकारचे दिल्ली येथील उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, महाराष्ट्र राज्य लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे - पाटील, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, रायगडचे उप-वन संरक्षक राहुल पाटील, गडचिरोलीच्या उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील - बेलपत्रे, सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, सांगली शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, सांगलीच्या उपशिक्षणाधिकारी डॉ. श्रीमती विमल माने, गटशिक्षणाधिकारी,अजिंक्य कुंभार, सुनिल आंबी, पोपटराव मलगुंडे, शिक्षण विस्तार अधिकारी छाया माळी, बाजीराव देशमुख, रविंद्र लोंढे केंद्रप्रमुख प्रफुल्ल काळे,सुधाकर पाटील, पोपट जाधव या शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक तसेच साहित्य वर्तुळातून ,आप्पासाहेब खोत, दि.बा.पाटील,रमजान मुल्ला, स्वाती शिंदे, दीपक स्वामी ,महादेव माने,हिम्मत पाटील, धनाजी माने तसेच राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्याकडूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.
राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत त्यांनी मिळवलेल्या यशामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे हे निश्चित . यावेळी बोलताना , बाबासाहेब परीट म्हणाले की
" हे यश केवळ माझ्या एकट्याचे नसून, माझे आई-वडील, सहकारी शिक्षक अधिकारी, विविध क्षेत्रातील कार्यरत मित्र परिवार आणि क्रांतिकारी भूमीचे आहे."
- धनाजी माने.....✍️





