Monday, August 08, 2022

थोडा जागर मांडला आहे.

 








 ( आज सभोवताली समाजात पाहिलं तर ,अनेक क्षेत्रातील लोकांना विविध समस्या आहेत यात शेतकरी,शिक्षक ,पोलीस,व्यावसायिक, विविध क्षेत्रातील खाजगी कर्मचारी अशा अनेक घटकांच्या विविध समस्या आहेत......निसर्गाच्या ल री लाटा माणसाला त्याच्याच चुकानमुळे सहन कराव्या लागत आहे.तरुणाईच्या समस्याही आहेत.

यातील फक्त काही समस्या  मांडण्याचा हा प्रपंच एवढचं........)


   थोडा जागर मांडला  आहे.....✍️


जो तो जगतो आहे आपल्याच कोशात 
आणि आपल्याच विश्वात.
अनेक समस्या आणि दुःख आहेत,
माणसामाणसात आणि समाजात , 
कुणालाच कुणाच देणंघेणं उरल नाही.
जो तो दंग आहे ,आपलाच कोश घट्ट विणण्यात.

शेतकरी असो वा शिक्षक,
पोलीस असो वा पूरग्रस्त
असे सारेच आहेत समस्याग्रस्त .
 

वाट्याला यावेत चार दिवस सुखाचे,
आपल्याबरोबरच,आपल्या मुलाचे.
आणि पिढ्यानपिढ्या वाढलेला,
कर्जाचा डोंगर कमी  होऊन ,
शांत झोप लागावी यासाठी ,
 लढाई आजूनही सुरूच आहे बळीराजाची.

तो समस्यांचा पाढा बोंबलून पाहतो,
दारे ठोठावून पाहतो,
तरी त्याच्या समस्या कधी सुटल्याच नाही.
कधी त्याने स्वतःला दोरीत लटकवूनही घेतले.
तरीही त्याचे प्रश्न ,  कधी नाही सुटले।

चार दिवस त्याच्या मरण्याचे अन्,
सांत्वनाचे फोटोसेशन झाले.........
पुढच्या पिढीच्या वाट्याला मात्र,
बाप गेल्याचे आणि बोंबलून- बोंबलून
हात गेल्याचे दुःखच वाट्याला आले.

तरीही सारेच कसे मशगुल आहेत ...
आपल्याच कोशात आणि आपल्याच विश्वात !


शिक्षक सुद्धा आंदोलन करत,
रस्त्यावर उतरतात.
आम्हाला 'फक्त शिकऊ द्या ! '
म्हणत लढाई- लढत राहतात.
ना पदांची भरती होत आहे ,
ना अतिरिक्त कामाचा ताण .
सारे असे आलबेल सुरु आहे.

शिक्षकांच्या बदनामीचे
षडयंत्र सुरुच आहे .
शिकवण सोडून,इतर कामातच,
गुरुजींना गुंतुन ठेवलं जातयं.
गोरगरिबांच्या शिक्षणाचा,
खेळखंडोबा मात्र सुरुच आहे.

सारेच कसे झोपलेत की,
झोपेचे सोंग घेतलयं कळत नाही.
वाडी- वस्तीवरील मुलांच्या,
शिक्षणाची हेळसांड 
भरतीविना  सुरूच आहे.
तरीही सारेच मशगुल आहेत आपल्याच 
कोशात आणि आपल्याच विश्वात.......

ज्यांनी कोरोणाच्या काळात ,
देवदूत म्हणून काम पाहिलं.
ते पोलीस तर कुठे ,
समस्यान पासून दूर आहेत ?
अतिरिक्त कामाच्या ताणाने तेही पुरे पिचलेत.

चार क्षण आपल्या लेकरा-बाळांच्यात असावेत,
गोरगरीब दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी ,
आपलेही दिवस खर्ची पडावेत
यासाठी तेही खूप आतुरलेत .....

समाजात फिरा ,नाहीतर रस्त्यावर फिरा.
समस्यांचे खड्डे काही मुजत नाहीत.
तरुणांच्या पिढ्या कामाविना भटकत आहेत.
व्यसनांच्या जंजाळात मात्र , ते अडकत आहेत.

कधी अवेळी पाऊस पडतो आहे.
तर कधी दुष्काळही पडतो आहे.
विकासाच्या नावाखाली , 
निसर्गावर अतिक्रमण सुरु आहे.

समस्यांच्या पाढ्यांचा ,
हा पाढा ........
न संपणारा असला तरी ,
समस्यांचा हा .....थोडा जागर मांडला आहे एवढचं.
 
- धनाजी माने.....✍️
dhanajimane.blogspot.com

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...