हे फक्त #हिमनगाचे एक टोक आहे.......
" पिकवलेले विकण्यासाठी #शेतकरी #आत्महत्या करु लागला आहे. #राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायच आहे काय? "
-#राजू शेट्टी
यावर्षी #फेब्रुवारी ,#मार्च ,आणि #एप्रिल फक्त या तीन महिन्यातच घडलेल्या घटना पाहिल्या तर समाजातील एक विदारक चित्र समोर येते. यामध्ये #सचिव सिंगल यांच्याकडे सापडलेली रक्कम असेल किंवा बीड मधील शेतकऱ्यांने केलेली आत्महत्या असेल ,#टी.ई.टी परीक्षा घोटाळा प्रकरण असेल किंवा अलिकडेच सांगली जिल्ह्यातील #माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णु कांबळे व #अधीक्षक विजय सोनवणे यांना #लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली #अटक केलेली असेल.
एकूणच हे चित्र भयानक असून #कटूसत्य आपणास #चिंतन करायला लावत आहे. सर्वसामान्य #गरीब,#बेरोजगार #सुशिक्षित तरुण , #शेतकरी यांच्या समस्या या कुणालाच दिसत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या #विश्वात संपत्ती मिळवणे , #पिळवणूक ,#शोषण करणे यातच #मशगुल आहे
हेच या उदाहरणावरून आणि प्रतिक्रियावरून लक्षात येईल.
◆#शेतकरी आत्महत्या....
#बीड जिल्ह्यात उसाचे गाळप होत नसल्याने एका शेतकऱ्याने शेतातील ऊस पेटवून देऊन फडातच असलेल्या लिंबाच्या झाडाला #गळफास लावून घेतला. ही घटना #हिंगणगाव (ता. गेवराई) येथे बुधवारी दुपारी घडली #नामदेव आसाराम जाधव (वय ३०) असे मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या व अशा अनेक शेतकऱ्यांच्या #आत्महत्या शेतकऱ्यांच्या जीवनातील दारिद्र्य, दैन्य व गरिबीत कसा तो होरपळतो .दुःख यातना भोगतो. आणि शेवटी आत्महत्येला कवटाळतो हेच समोर येतं.
यावर #खासदार राजू शेट्टी यांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत. त्यांनी अगदी कमी शब्दात #कटूसत्य मांडले आहे. बळीराजाचे जीवन #वास्तव सांगितले आहे.
ते म्हणतात ...." पिकवलेले विकण्यासाठी शेतकरी आत्महत्या करु लागला आहे. राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या #मुडद्यावर #राज्य करायच आहे काय? "
- #राजू शेट्टी
◆टीईटी परीक्षेतही गैरप्रकार
#पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना #टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे #धागेदोरे हाती लागले होते.
या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल #२४० कोटी रुपयांची असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते #चार लाख रुपये घेतले असल्याचेही तपासात समोर आले.परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष #तुकाराम सुपे आणि #सुशील खोडवेकर यांच्यासह याप्रकरणी १४ जणांना #अटक झालीआहे.
टीईटी परीक्षेत आर्थिक #गैरव्यवहार करताना प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते चार लाख रुपये घेतले. त्यातून तब्बल दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याची व्याप्ती झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ७ हजार ५८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. एकूण ३ लाख ४३ हजार २४३जणांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या अंतिम निकाल यादीत एकूण १६ हजार ७०५जण पात्र ठरले, त्यांना टीईटी #प्रमाणपत्र देण्यात आली .
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी #महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे , माजी आयुक्त #सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा #तांत्रिक सल्लागार #अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा #आश्विन कुमार, #सौरभ त्रिपाठी , #डॉ. प्रीतिश देशमुख आणि #आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह इतरांना अटक करण्यात आली. या घोटाळ्यातील एक आरोपी #राजेंद्र सोळुंके आणि #मुकुंद सूर्यवंशी हे दोघेही एकाच गावचे राहणारे आहेत.
या घोटाळ्यांचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच सांगली जिल्ह्यात #शिक्षण विभागाचे प्रकरण समोर आले.
◆ शिक्षण अधिकारी आणि अधीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.......
सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे #शिक्षणाधिकारी आणि $अधीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी ३ शिक्षकांकडून #पदवीधर #वेतनश्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी #६० हजार रूपये प्रमाणे #लाच मागितल्याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.
याप्रकरणी #लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेंचा यांचा व्हिडीओही समोर आला.व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे #खळबळ माजली . दरम्यान, विष्णू कांबळे ३०जून रोजी #निवृत्त होणार होते. निवृत्तीच्या जवळपास दोन महिन्यांपूर्वी विष्णू कांबळे यांची #लाचखोरी उघड झाल्यामुळे चर्चेचा विषय ठरली.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, केलेल्या विविध आरोपामुळे. शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे.
३ शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी ६० हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. विष्णू कांबळे आणि विजयकुमार सोनवणे अशी लाच स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. १लाख ७० हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडलं होतं. दोघांवर #विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये #लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली #गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंतची #सांगली जिल्हा परिषदेतील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
#तक्रारदार आणि त्यांचे दोन #शिक्षक #मित्र यांचे #पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली यांच्याकडे दिला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षण अधिकारी कांबळे आणि अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार, त्यांचे शिक्षक मित्र यांच्याकडे प्रत्येकी ६० हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज २६ एप्रिल रोजी #अँन्टी करप्शन #ब्युरो सांगली पथकास दिला होता.
● यावरच्या समाजातून आलेल्या बोलक्या प्रतिक्रिया
"लाचखोर सर्व लोकांना अतिशय कडक शिक्षा व्हावी सर्वांचेच #चेकींग करावे व लक्ष ठेवून कारवाई करावी सगळीकडे लाच घेतल्याशिवाय कामच करत नाहीत. मग उगीचच #चुका काढायच्या खूप #हेलपाटे लावायचे कुठे फेडतील सगळे ह्यांची साखळी खालपासून वरपर्यंत कोण तोडू शकणार नाही वाटतं "
- एस.डी .बारवकर
● "शिक्षणाधिकारी .अधिक्षक अप्रोव्हल सेक्सेनचा क्लार्क पेयुनिट मधील क्लार्क . अधिक्षक. ह्यांच्या ज्ञातस्त्थोत्राच्या पेक्षा उत्पन्नाची ACB ने तात्काळ महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची #तपासणी करवी या वर चिंतन व्हावे "
- राजेंद्र राऊत
● " सगळीकडेच #बोंबाबोंब. #बुलढाणा माध्य शिक्षण विभाग तर मेडीकल #बील काढायचे सुद्धा #10% प्रमाणे पैसे घेतात नालायक ! " - गणेश जयभे, #बुलढाणा
● "यांचा #इतिहास तपासा. #सोलापूर मध्ये ही याने खूप काही केले होते. अगोदर एकदा #सस्पेंड झालेला होता. "
- युवराज एम
या प्रकरणाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच इतर राज्यातील ही धक्का देणाऱ्या गोष्टी समोर येतात आणि लाचलुचपततिची प्रकरणे किती मोठी असतात याने सर्वसामान्य सुद्धा चकित होतात
◆#रांची #झारखंड येथील #खाण सचिव पूजा सिंघल अटकेत '....
#मनरेगा'च्या निधीतील गैरव्यवहारप्रकरणी #सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल यांना
( बुधवारी ११मे२२)अटक केली. सिंघल यांना याआधी '#ईडी'कडून चौकशीसाठी #समन्स बजावण्यात आले होते. तत्पूर्वी, 'ईडी'ने ७ मे रोजी केलेल्या कारवाईमध्ये #सनदी लेखापाल सुमनकुमार यांना अटक केली होती. 'ईडी'ने कुमार यांच्या कार्यालयातून १७.५१ कोटी रुपयांची तर #पल्स हॉस्पिटलमधून १.८ कोटी रुपयांची #रोकड #जप्त केली होती. #सीए सुमनकुमार याच्या घरातून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती.
एकूणच या सर्व बातम्यांचा आढावा आणि प्रतिक्रिया पहिल्या असता समाजामध्ये किती #विदारक #चित्र आहे हे समोर येते. एका बाजूला आपल्या संसाराला #ठिगळं लावण्यासाठी #शेतकरी रात्रंदिवस झटत असूनही त्याच्या वाट्याला सुखाचा $क्षण आलेला दिसत नाही. आणि हाच सर्वांचा #पोषण करता #तारणहार एकेदिवशी मृत्यूला कवटाळतो ,आत्महत्या करतो. तर दुसर्या बाजूला देशसेवेचे #शपथ घेणारे लोकांची सेवा करणारे #लोकसेवक मात्र सर्वसामान्यांची पिळवणूक करताना दिसत आहेत. हजारो-लाखो नव्हे तर कोटींचा #घोटाळा.... ही कोटीची उड्डाणे पार करत आहेत .
सर्वसामान्यांच्या समोर शिष्टाईचा #बुरखा पांघरून अनेक चांगल्या गोष्टीची #लेक्चर देणारे , #तत्त्वज्ञानाचे डोस देणारे. सर्वांसमोर #मानसन्मान स्वीकरणारे ,हारतुरे स्वीकारणारे हे अधिकारी मात्र #पडद्याआड किती मोठे #पाप करत असतात.लूट करत असतात. पदाचा उपयोग लोकांची सेवा न करता, किती मोठा भ्रष्टाचार करत असतात हेच समोर येत आहे. हे उघड झालेली काही विभागातील काही उदाहरणे आहेत.
असे उघडं न झालेले घोटाळे आणि जाळ्यात न सापडलेले #छोटे -बडे #मासे कितीतरी आजही आपल्यासमोर #उजळ माथ्याने फिरत असतील हे मात्र #निश्चित ! ते फक्त अजून #जात्यात नाहीत तर सुपात आहेत एवढेचं !
हे फक्त #हिमनगाचे एक #टोक आहे......अशा घटना वाचून मन व्यथित होते.चीड येते .पण आपण काहीच करु नाही शकत......
हे परमेश्वरा अशा भ्रष्ट लोकांंना , अशा वाईट प्रवृत्तीपासून दूर कर आणि सर्वसामान्य माणसांची, गोरगरिबांची मनापासून सेवा करण्याची सद्बद्धी देरे देवा !!😢😢😥😥
- धनाजी माने....✍️

No comments:
Post a Comment