Thursday, May 13, 2021

गुरुजींनी शिकवायचं कधी ?

 ◾केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध अशैक्षणिक कामांची जबाबदारी शिक्षकांना देण्यात येते त्यामुळे शिक्षक शिकविण्यासाठी कमी आणि अशैक्षणिक कामे करण्यात जास्त व्यस्त असल्याचे चित्र राज्यभरात आहे.
आम्ही जहाजांच्या कप्तानाकडून गुणवत्तेची अपेक्षा करतो आणि त्यांना २५०अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतो, हे योग्य नाही. यात केंद्र सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व कामांचा समावेश आहे. शिक्षण सोडून बाकी अनेक अशैक्षणिक कामे  प्राथमिक शिक्षकांना करावी लागतात.
याची सविस्तर यादी पाहिली तर हे लक्षात येईल. पण ......हे सर्व सोसत प्राथमिक शिक्षक आपले काम इमाने इतबारे  करतात....
..✍️





गुरुजींनी शिकवायचं कधी  ?

 
तुम्हीच सांगा गुरुजींनी शिकवायचं कधी ?
खरखुर काम गुरुजींच मुलांना शिकवण्याच!
त्यासाठी त्यांना वेळ मिळतो किती?
तुम्हीच सांगा गुरुजींनी शिकवायच कधी?


रोज नवा दिवस ,नवा फतवा घेऊन येतो.
Whatsapp वर तो तात्काळ समोर येतो.
शिकवायचे सोडून .........
त्याचाच  अभ्यास गुरुजींना करावा लागतो.
अध्यापन सोडून यातच सारा वेळ जातो.

शाळेतल्या गुरुजीवर सारा गाव कारभारी,
किती त्या कमिट्या आणि किती ते कारभारी.
प्रत्येकाच ऐकूण जेरीस आलाय गुरुजी.
शपथं सांगतो मेटाकुटीस आलाय गुरुजी.


रोज नवा आदेश ,आणि रोज नव पत्रक,
शिक्षण खात सोडून ,इतरांचाही धडाका सुरुच आहे.
उपक्रमाचे फोटो आणि फोटोupload करण्यात
वेळ वाया जातो आहे.नुसतीच ही प्रसिद्धी

 मुलांच्या पदरात काय पडत आहे?

निवडणुकीची काम तो इमानेइतबारे करतो,
राष्ट्रीय काम म्हणून ,तो त्याला सामोरे जातो.
मग..BLO च्या कामात तो वर्षभर गुंतून राहतो.
शिकवायचं सोडूनत्यातचं तो हरुन जातो.

Online कामाचा  ससेमिरा सुरुच आहे.
तात्काळ माहिती देण्याचा आदेश समोर आहे.
नाही तर ,कारवाईचा बडगा तयार आहे.
अध्ययन-अध्यापन सोडून हेच काम सुरु आहे.

आत्ता तुम्हीच सांगा !
गुरुजींनी शिकवायचं कधी ?
गुरुजींनी शिकवायचं कधी ?

- धनाजी  माने

No comments:

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...