🌿माठ आणि माठातील थंडगार पाणी -पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरी मातीची भांडी वापरली जायची. तवा, कढई अशी भांडी जेवण बनवण्यासाठी तर रांजण , माठ, अशी भांडी पाणी साठवण्यासाठी वापरली जायची.उन्हाळा सुरू झाला की, लोक आपल राहतं घर आणि पिण्याचं पाणी कसं थंड ठेवता येईल याचा खूप विचार करतात.या दिवसात थंड पाणी पिल्याने शरीराला खूप आराम मिळतो.उबाळ पाणी पिल की तहान काही भागत नाही.मग काही लोक फ्रीज मद्धे पाणी बॉटल ठेवतात आणि त्याचा आधार घेतात.पण फ्रीजमधील थंड पाणी त्रासही देते. असा अनेकांचा अनुभव आहे.रेफ्रिजरेटरचे पाणी पिण्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तरीही उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपला हात थंड पाण्याच्या शोधात फ्रीजकडे जातो. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीएन नावाचे केमिकल असते जे आरोग्याला धोकादायक असते. म्हणून शक्य तितका प्लास्टिकचा वापर कमी करा.उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठाचा वापर करणं फायदेशीर आहे. पण हे अनेकांना फायदे माहिती नसतात.मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. ते खास फायदे...♨️ पोट चांगलं राहतंबर्फाचं पाणी किंवा फ्रिजमधील पाणी प्यायल्याने अनेकांना पोटात दुखायला लागतं. घसाही यामुळेंळे खराब होतो. वाताचा त्रासही व्हायला लागतो. पण मातीच्या मडक्यातील पाणी अधिक थंड नसल्याने वात होत नाही. मडक्याला रंग देण्यासाठी गेरुचा वापर केला जातो. गेरु उन्हाळ्यात थंडावा देण्याचं काम करतो.🌿 पुरूषांना मिळतो मोठा फायदापुरुष आणि महिला या दोघांच्याही शरीरात टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्स असतात. नियमीतपणे मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते. प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरुन ठेवल्याने प्लॅस्टिकमधील अशुद्ध गोष्टी एकत्र होतात. त्याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. महत्वाची बाब म्हणजे मातीच्या मडक्यात पाणी साठवून ठेवल्याने आणि ते प्यायल्याने शरीरातील टेस्टोस्टेरोन हार्मोन्समध्ये वाढ होते.♨️ विषारी पदार्थ दूर करतंमातीत अशुद्ध गोष्टींना शुद्ध करण्याचे गुण असतात. त्यामुळे माती पाण्यातील सर्वच विषारी पदार्थांचं शोषण करते. यासोबतच माती पाण्यात असलेल्या सर्वच सूक्ष्म पोषक तत्वांना एकत्र करण्याचं काम करते. त्यामुळे पाण्याचं तापमान संतुलित राहतं. म्हणजे पाणी ना जास्त थंड होत, ना जास्त गरम...🌿 घसा चांगला राहतोउन्हाळ्यात फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने घसा आणि शरीरावर मोठा प्रभाव पडतो. थंड पाणी प्यायल्याने घशातील पेशींचे तापमान कमी होते आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. थंड पाणी प्यायल्याने घशातील ग्रंथींवर सूज येते. पण मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने असे काही होत नाही.थोडक्यात महत्त्वाचे -🌿 फ्रिजमधील पाण्याचे तोटे१ अनेकदा पोटात दुखण्याची शक्यता असते.२ घसा खराब होतो.३ वाताचा त्रास होऊ शकतो.४ घशातील पेशींचे तापमान कमी होऊन अनेक समस्या होतात.५ घशातील ग्रंथींवर सूज येते.Ⓜ️ मातीच्या भांड्यातील पाण्याचे फायदे१) मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने घशाचा त्रास होत नाही.२) हे पाणी अधिक थंड नसल्याने वात होत नाही.३) गेरुमुळे शरीराला थंडावा मिळतो.४) यात विषारी पदार्थ शोषून घेण्याची क्षमता ५)पाण्यात सर्व सूक्ष्म पोषक तत्व एकत्र येतात.६)पाण्याचे तापमान संतुलित राहते.७) शरीरात टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्सचा स्तर वाढतो.८)रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते.९)अॅसिडीटीची समस्या दूर होते.👌माठात मुळातच पाणी गार असते. पण तुम्ही या एका पद्धतीने ते आणखी गार करू शकता.माठ एका लोखंडी स्टँडवर ठेवा.त्यानंतर त्या स्टँडवर माठ ठेवण्यापूर्वी एक मातीची कुंडी किंवा पसरट भांडे ठेवावे. यावर माती घालून ती भिजेल इतकं पाणी घालावं.यानंतर त्यावर पाण्याने भरलेले माठ ठेवावे.यामुळे माठाला खालच्या बाजूनेही गारवा मिळेल आणि पाणी आणखी गार होईल.कायम लक्षात ठेवा माठ खिडकीजवळ हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा पण तेथे उन लागणार नाही याची काळजी घ्या.तशी जागा नसल्यास माठ काळोखाच्या ठिकाणी किंवा जेथे उन्ह आणि गॅसची झळ लागणार नाही असा ठेवा.तसेच माठावर कायम एक ओला टॉवेल किंवा कापड ठेवा. ज्यामुळे माठाला बाहेरूनही गारवा मिळेल.यामुळे पाणी पुर्वीपेक्षा अधिक थंड होईल.♨️ माठातील पाणी वापरताना घ्यावयाची काळजी -माठ दररोज स्वच्छ करावा. जेणे करून त्याला गार राहण्यास मदत होईल.माठातील पाणी पिताना सर्वात प्रथम माठ स्वच्छ ठेवून घ्या.अनेकदा माती निघत असते. तर तळात जमा राहते. याचा त्रास होऊ शकतो.तसेच माठ दररोज स्वच्छ करा अन्यथा माठाला आतून बुरशी येते.बुरशीजन्य पाणी प्यायल्यास शरीरावर दुष्परिणाम होतात.खरचं जुन तेच सोनं.मातीचा माठ आणि माठातील थंडगार पाणी ,तो मातीचा वास ,याची मजाच न्यारी ! हे मात्र जो अनुभवतो त्यालाच माहिती !- धनाजी माने.....✍️
Saturday, February 24, 2024
माठ आणि माठातील थंडगार पाणी....
Subscribe to:
Post Comments (Atom)
भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर
भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...
-
“खेळात जिंकलेले उपविजेतेपद आणि गावकऱ्यांच्या प्रेमाने जिंकलेली मने – जिल्हा परिषद शाळा कोरेगांव.” ================================ 🏆 कोर...
-
कवी यशवंत एका ठिकाणी बैलपोळा सणाबाबत म्हणतात. शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली, ऐनेदार.... सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर म...
-
===================================== “ रमजान ईदची ( शिरखुरमा ) खीर थांबली… पण नातं अजूनही श्वास घेत आहे” ==================================...

No comments:
Post a Comment