राजं परत तुम्हाला याव लागणार,
राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.
तुम्ही रयतेचं राजे होता ,
सारा कसा आनंदी आनंद होता,
राजे जरी असला तुम्ही
जनतेत मनापासून मिसळत होता.
आता असे काही उरले नाही .
नवे नेते ,नवे कायदे आले तरी.
रयतं काही सुखी झालीच नाही.
म्हणूनच.......
राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.
तुम्ही कशी सगळ्यांची ,
मोठ बांधली होती.
अठरा पगड जातीची माणसं कशी ,
गुण्यागोविंदाने राहत होती.
आता राज इथं अस घडत नाही,
जाती-जातीत धर्मा-धर्मात,कलह सुरु आहेत.
तसे घरा-घरात , गल्ली- बोळात तेढ सुरु आहे.
गटा-गटाने आणि वार्ड कमेटीने ही जंग चालू आहे.
म्हणून.....
राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.
तुमच्या सोबत तेव्हा ,
जीवाभावाचे एकनिष्ठ मावळे होते.
जीवाची बाजी लावणारे ,बाजी होते.
रयतेच्या सुखासाठी प्राणाचे बलिदान देत होते.
आता राज इथ अस काही उरल नाही.
विश्वासू , निष्ठावानांची वानवा आहे.
इकडून- तिकडे पळणारांची आणि पळवणारांची
स्पर्धा इथे सुरु आहे.
म्हणून......
राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.
राज तुमच्या काळात ,लगेच न्याय मिळायचा.
आया-बहिनीनकडे वाकडी नजर करणारांचा,
आणि भ्रष्टाचाऱ्यांचा तुम्ही कडेलोट करायचा.
राज जनतेला आता न्यायासाठी,
वर्षानुवर्षे लढाव लागतयं.
रोज नव्या गुन्ह्यांचे आणि भ्रष्टाचाराचे,
पेव इथ फुटलयं, मन कस खिन्न झालयं !
म्हणूनच म्हणतोयं , हात जोडून विनवणी करतोयं......
राजं परत तुम्हाला याव लागतयं..
राजं परत तुम्हाला याव लागतयं...
राजं परत तुम्हाला याव लागतयं.......
- धनाजी माने....✍️
dhanajimane.blogspot.com
.jpeg)
3 comments:
✍️✍️Mast
😍😍😍😍
😊😊😊👍👍👍👍👍
Post a Comment