🙏🏻चला घारेवाडीस जाऊया !
प्रत्येक वर्षी जानेवारीत वेळ काढूया !
#घारेवाडी , महाराष्ट्रातील तरुणांची #पंढरी आणि #तमाम तरुणांचे #विठ्ठल,#माऊली आमचे आदरणीय #काकाजी #मा.इंद्रजित देशमुख ( मा.अतिरिक्त #मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.#कोल्हापूर)
आदरणीय काकाजी एका विधायक ध्येयाने #प्रेरित होऊन ,स्वत: अनेक गोष्टींचा #त्याग करून अविरतपणे झटताहेत.महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रत्येक तरुणांच्यामद्धे #स्वामी विवेकानंदांच्या आचार ,विचारांचे रोपण होऊन त्याचा #वटवृक्ष व्हावा यासाठी ते #अहोरात्र कष्ट घेत आहेत.
' शिवम प्रतिष्ठानच्या ' माध्यमातून ते बलशाली युवा घडावेत यासाठी प्रत्येकवर्षी '# युवा ह्रदय संमेलनाचे ' #घारेवाडी ता.#कराड येथे आयोजन करतात.
अनेक #कर्तृत्ववान लोकांना एका छत्राखाली आणतात.ज्यांची करणी आणि कथनी समान आहे , अशा विधायक विचाराने वेड्या झालेल्या #ध्येयवेड्या लोकांना या युवा संमेलनात त्यांचे प्रेरणादायी विचार ऐकवतात.
ही #ऊर्जा घेऊन महाराष्ट्रातील तमाम #तरुण जातात.आणि काहीतरी चांगले बनून दाखवायचे याने झपाटून जातात.आणि करूनही दाखवतात. हे अनेकांनी ही घारेवाडीची #वारी करणारांनी आणि आदरणीय काकाजी यांच्या अमृतवाणीचे #श्रवण केले त्यांनी अनुभवले आहे.
भारताचा नवतरुण, म्हणजेच एक #ज्वलंत धमन्यांचे #स्पंदन आणि असे हे तरुण धाडशी ,खंबीरमनाचे #निर्व्यसनि,#भ्रष्टाचारमुक्त.देशभक्तीने भारावलेले #युवक इथे घडावेत.त्यांच्या मनांची चांगली मशागत व्हावी.भारताला बलशाली ,शक्तीशाली आणि पायमल्ली होत असलेल्या संस्कृतीची नव्याने आदर्शवत #बीजे रोवली जावीत या #ऊत्तूंग सद्विचाराने आदरणीय काकाजी ध्येयवेडे होऊन स्वत:चा #प्रपंच बाजूला ठेवून हा सारा #जगाचा प्रपंच करीत आहेत.
भरकटलेला तरुणांचा #जीवनरथ ,आणि सैरावैरा पळणारा #वारु जेव्हा या घारेवाडीच्या नवनिर्माण करणाऱ्या पुनित भूमित तीन दिवस स्थिरावतो आणि इथले अमृतवाणीतून पडणारे #अमृतकण वेचतो तेव्हा त्याला इथे निश्चितच जीवनाचे खरे ध्येय सापडते.त्याचा जीवनरथ आणि त्याचा वारु योग्य असेच मार्गक्रमण करतो.
यासाठी त्याने फक्त जानेवारी महिन्यात #स्वामी विवेकानंद #जयंती दरम्यानच्या काळात ,घारेवाडी या प्रतिपंढरीत वास्तव करून , बरसणाऱ्या या भुमितील अमृतकणांचे सेवन करायला हवे एवढेचं !
जय हो ! मंगल हो !!
धनाजी माने....✍️

No comments:
Post a Comment