अहो !आश्चर्यम्.... #अबब! लग्नपत्रिकेत तब्बल ३५० नावे !!
अशी #लग्नपत्रिका आपण कुठे पाहिले आहे का?
#दहा, #वीस, #तीस, #पन्नास नव्हे.... तब्बल #साडेतीनशे नावे लग्नपत्रिकेत.... काय धक्का बसला ? पण हे खर आहे राव !
वर आहे इस्लामपुरचा तर वधू आहेत पुण्याच्या.
या वधू-वरांचा विवाह रविवारी २२ मे २०२२ रोजी इस्लामपूर (ता.वाळवा) येथे संपन्न होत आहे.
लग्न पत्रिकेत #नाव नाही म्हणून अनेकजण #नाराज होतात #रुसवे-फुगवे सुरू होतात .पण या #विवाह सोहळ्यात सर्वांनाच मान देण्याचा प्रयत्न #वरपक्षाने केल्याचे दिसत आहे. कुणाचेच रुसवे-फुगवे यायला नकोत याची काळजी घेतल्याचे दिसत आहे.
#भावकी, #पाहुणे, #हितचिंतक, निमंत्रित अशी जवळजवळ तीनशे पन्नास नावे वरपक्षाने या पत्रिकेत छापली आहेत.
या लग्न पत्रिकेतील भल्यामोठ्या यादीची #सर्वत्र #चर्चा मात्र सुरू आहे.
वाळवे तालुक्यातील नव्हे तर #सांगली जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील हा पहिलाच विवाह प्रसंग असेल की लग्नपत्रिकेत तब्बल साडेतीनशे नावे असतील.
गेल्या दोन वर्षा पासून आपण पाहतोय कोरोनाने आपणाला बरच काही शिकवलं. कोणताही #समारंभ असो निमंत्रित मर्यादित असायचे. लग्नात खर्च कमी व्हायचा.
अनेकांनी #यादी पे शादी, #घरगुती मर्यादित निमंत्रित असेच लग्न समारंभ उरकून घेतले.
यामध्ये एखादा चुकला तरी #राग कोणाला येत नव्हता .#माणसं समजून घेत होती.
पण आता मात्र कोरोणा गेल्यानंतर ,लग्नसमारंभ मोठ्या धुमधडाक्यात, थाटामाटात सर्वत्र सुरू आहेत. हजारो लोकांची #गर्दी जमत असते. हजारो लोकांच्या जेवणाच्या पंगती उठतात .#बँजो ,#बॅंड ,#वरात हे सर्व पूर्वीप्रमाणे पार पडत आहे. याचे #अप्रूप कोणालाच वाटत नाही.
पण या लग्नातील ३५० नावांची लग्नपत्रिका मात्र सगळ्यांचंच #लक्ष वेधून घेते हे मात्र #निश्चित !
- धनाजी माने....✍️

1 comment:
😯😯😯😦
Post a Comment