Thursday, May 05, 2022

शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन !

                     राजर्षी छत्रपती शाहू महाराज


🙏 #६ मे २०२२ - शाहू महाराज यांचा १०० वा #स्मृतिदिन !

लोकराजा #राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त......

◆ शुक्रवार दि. ६ मे रोजी

◆ सकाळी १० वाजता १०० सेकंद

◆ स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुयात..!

=================================

📑 राजांचा जीवनपट ....🎥

◆ शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी #कागल येथील घाटगे घराण्यात झाला. 

◆पूर्ण नाव #यशवंत जयसिंगराव घाटगे .

◆ आईचे नाव #राधाबाई होते.

◆चौथे #शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर यशवंतला दत्तक घेतले. त्यांचे “शाहू” असे नामकरण करण्यात आले. #शाहू महाराज लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचेहोते.ते न्यायप्रेमी होते.

◆१ एप्रिल १८९१ साली ते #लक्ष्मीबाई खानविलकर यांच्याशी विवाहबद्ध झाले.#राजाराम व #शिवाजी हे दोन मुलगे व #राधाबाई व #अनुबाई या दोन कन्या होत्या .शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८९४ साली त्यांचा #राज्याभिषेक करण्यात आला.

◆संस्थानातील सर्व मुलांना #प्राथमिक शिक्षण #मोफत दिले. स्त्री शिक्षणासाठी देखील ते नेहमी आग्रही होते. 

◆#जातीभेद आणि #अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. अस्पृश्यांच्या वेगळ्या #शाळा भरवणे बंद केले.

◆छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी १९१९ मध्ये भेट झाली ती #डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि #मूकनायक वृत्तपत्रासाठी सहकार्य केले

◆ #राधानगरी धरणाची उभारणी, #शेती तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड #अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ची स्थापना,#शाहुपुरी व्यापारपेठ, ,शेतकऱ्यांची सहकारी संस्था,अशा कामातून शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले. 

◆आपल्या अधिकारांचा फायदा #बहुजन समाजाला मिळवून दिला. त्यांच्या न्यायासाठी आणि शिक्षणासाठी ते नेहमी झटले.

◆ १९१७ साली त्यांनी #पुनर्विवाहाचा कायदा करून#विधवा विवाहास कायदेशीर #मान्यता मिळवून दिली.

◆जातीव्यवस्थेची #शिकार झालेल्या अनेक #जमाती च्या लोकांना #गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी #ब्रिटिश कालीन हजेरी पद्धत बंद करून त्यांनी कोल्हापूर संस्थानात नोकऱ्या दिल्या . त्यांना घरे बांधून दिली . ,वणवण भटकणाऱ्या लोकांची राहणाऱ्या पोटापाण्याची सोय झाली . गुन्हेगारी पासून मुक्ती होऊन त्या लोकांना समाजात #माणूस म्हणून सन्मानाने वावरता येऊ लागले .

◆शाहू महाराजांना #‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी #क्षत्रिय समाजाने दिली. #

◆इतिहासकारांनी त्यांची नोंद #लोककल्याणकारी #राज्यकर्ता म्हणून केली आहे. 

◆६ मे १९२२ रोजी #मुंबई येथे त्यांचे निधन झाले

■ आपल्या ४८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी #आरोग्य,#कृषी, #शिक्षण,#कला , #उद्योग,  व #क्रीडा अशा अनेक क्षेत्रात अविरतपणे महत्त्वपूर्ण #योगदान  दिले. अशा या #महान राजांना  #विनम्रपणे #अभिवादन!

- धनाजी माने ......✍️


==================================

 

No comments:

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...