Saturday, April 23, 2022

जनता म्हणते...भोंगे काढून किंवा चालीसा म्हणून....


 


जनता म्हणते.......


#नेते आणि #राज्यकर्ते हवेत,

माझ्या #शाहू -फुले....

#आंबेडकरान सारखे आणि

#छत्रपती शिवबान सारखे


नकोत नुसतेच एक - दुसऱ्यावर ,

ओरडून तेढ निर्माण करणारे.

#मना-मनात आणि #जाती-धर्मात

#भिंती घालून ,आपली #पोळी भाजणारे.


घ्यावेत #आदर्श थोडेतरी #शिवछत्रपतींचे,

अठरा #पगड जातींना एकत्र बांधण्याचे.

व्हावे त्यांच्याच सारखे #रयतेचे राजे ,

रयतेसाठी #जगणारे ,आणि रयतेसाठीच #मरणारे.


असे नेते नको आहेत जनतेला,

#भेदाभेद निर्माण करून,

 #सुरुंग लावतात ऐक्याला.

#संघर्ष माजवून,खतपाणी घालतात #दुहीला


संघर्ष जरूर असावा ....

तो बाबासाहेबांनी सांगितलेला,

#शिका, #संघटीत व्हा ! आणि #लढा!

या पावलावर #पाऊल टाकणारा


#जनता म्हणते  नेते हवेत असे आम्हाला.

मंदिरातील देवाइतकेच, #अल्लालाही माणणारे.

आणि........

मशीदीतील #अल्लाप्रेमी, #चालीशात #रमणारे.


लोक म्हणतात नेत्यांनी,

जरूर ओढावेत #आसूड,

#महात्मा फुल्यांच्या आसूडांनसारखे,

चुकीच्या परंपरांनवर #प्रहार करणारे.


आहो , #भोंगे काढून किंवा #चालीसा म्हणून,

जनता कधीच सुखी होणार नाही.

#शाहू राजांनसारखी , रयतेची काळजी केल्याशिवाय,

#सर्वसामान्य ,#गोरगरीब #सुखी कधीच होणार नाही.

- #धनाजी माने ....✍️

9403963934

dhanajimane123@gmail.com
























No comments:

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...