📌 #कोरोना #विषाणू अत्यंत धोकादायक आहे आणि अतिसूक्ष्म आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता तो मानवी शरीरात शिरतो, राहतो आणि निघूनही जातो. बरेचदा शरीरावर त्याची कोणती लक्षणेही दिसत नाहीत. त्यामुळे त्याचे अस्तित्व ओळखून त्याला रोखणे जवळजवळ अशक्य होते.‘कोव्हिड-१९’ या साथीच्या दृष्टीने पाहिले, तर जीवनाच्या नाण्याला दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे, #अस्तित्व राखण्यासाठी जगणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, शरीर आणि मनाचे संतुलन राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे.पहिला #लॉकडाऊन #जाहीर झाला, तेव्हा म्हणजे २३ मार्च रोजी भारतात ‘कोव्हिड-१९’चे ४१५ रुग्ण आणि दहा #मृत्यू नोंदविण्यात आले होते. मार्चच्या अखेरीपर्यंत रुग्णसंख्या १२५१ वर पोहोचली आणि ३२ मृत्यूंची नोंद झाली होती. एप्रिलच्या अखेरीस रुग्णसंख्या ३३,०६२ वर आणि मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १०७९वर गेला. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्यास केवळ काही दिवस उऱले असताना म्हणजे १२ मे पर्यंत देशात ७४,०७९ रुग्ण आणि २,४१० मृत्यू नोंदविण्यात आले. याचा अर्थ मार्चच्या अखेरीपर्यंत केवळ सात दिवसांत रुग्णसंख्या आणि मृत्यू तिपटीने वाढले. या सर्व घडामोडींचा आढावा घेतला असता करोणाने माणसाला बरेच काही शिकवले........✍️

6 comments:
सन्मा. माने सर छान लेखन...
खूप छान लेखन
छान व्यक्त केलात सर👌
🙏Thanks
🙏Thanks
🙏धन्यवाद !
Post a Comment