Monday, May 15, 2023

शिक्षकांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी शासनाने संधी उपलब्ध करुन दिली आहे

 








डिजिटल शिक्षणाचे वेगळेच महत्त्व लक्षात घेऊन

राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांना ,१० कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी.

राज्यशासनाने ११ मे २०२३ रोजी शासन निर्णय काढून शिक्षकांना हि संधी उपलब्ध करुन दिली आहे.

📌 सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०५१११८४८३०४३२१ असा आहे. 


शिक्षकांची इ- साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी, यासाठी राज्य शासनाने ही कोट्यवधी  रुपयांची बक्षीसे जाहीर केली आहेत.


प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विषय व गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील. यातील उत्कृष्ट शिक्षकांना रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरवांकीत करण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धक यांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तरावर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीची खुली स्पर्धा आयोजित केली आहे.


तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करत असताना शिक्षकांमार्फत बनवले गेलेले इ -साहित्य हे जास्त परिणामकारक असल्याचे दिसून येत आहे, या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


🎼🎶🎞️ स्पर्धेसाठी गट📺🎬


पहिला गट

१ली ते २ री

दूसरा गट

३ री ते ५ वी

तिसरा गट

६ वी ते ८ वी

चौथा गट

६ वी ते ८ वी

पाचवा गट

११ वी व १२ वी

सहावा गट

अध्यापक विद्यालय


📌 यासाठी ……समित्यांची रचना केली आहे

तालुका स्तरावरील निवड समिती

जिल्हा स्तरावरील निवड समिती

राज्य स्तरावरील निवड समिती अशी विभागवार समित्यांची रचना केली आहे


🏆 बक्षिसे 🏆

तालुकास्तरीय ,जिल्हास्तरीय ,राज्यस्तरीय

खालीलप्रमाणे असणार आहेत 🏆


तालुकास्तरीय

🥇प्रथम पुरस्कार- ५ हजार रोख व प्रमाणपत्र

🥈द्वितीय पुरस्कार- ४ हजार रोख व प्रमाणपत्र

🥉तृतीय पुरस्कार- ३ हजार रोख व प्रमाणपत्र

जिल्हास्तरीय

🥇प्रथम पुरस्कार- १० हजार रोख व प्रमाणपत्र

🥈द्वितीय पुरस्कार- ९ हजार रोख व प्रमाणपत्र

🥉तृतीय पुरस्कार- ८ हजार रोख व प्रमाणपत्र

राज्यस्तरीय

🥇प्रथम पुरस्कार- ५० हजार रोख व प्रमाणपत्र

🥈द्वितीय पुरस्कार- ४० हजार रोख व प्रमाणपत्र

🥉तृतीय पुरस्कार- ३० हजार रोख व प्रमाणपत्र


📌निकष

स्पष्टपणा (Simplicity),गरजाधीष्ठितपणा (Relevance),परिणाम (Impact),नाविण्यता (Creativity),समन्वय (Engagement),उपयोगिता (Reusability),चित्रफित दर्जा (Video Quality)

✍️ या निकषांवर १०० गणांचे गुणदान होणार आहे.


📌🎞️ उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष-

व्हिडीओ निर्मिती साठी आवश्यक आशय मजकूर आदर्श असावा.लिंग समभाव, शासकीय ध्येय धोरणाशी सुसंगत आशय असावा.व्हिडीओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेला असावा.व्हिडीओ ची साईज ही विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी.निर्मित व्हिडीओ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम.व्हिडिओमधील मजकूर, चित्रे, रंगसंगती अचूक व योग्य असावीत.शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडीओ चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग इत्यादी बाबींना महत्व असेल. आवाजात सुस्पष्टता असावी. आवाजाची / बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी. आवाज आरोह- अवरोह युक्त असावा. बँकग्राउंड नॉईज नसावा. जर बँकग्राउंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे. बँकग्राउंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आशयाशी संबंधित असावे.


📌 🎬 व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी -

शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडीओ बनविणे आवश्यक आहे. वरील व्हिडीओ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक

व्हिडिओ बनविणाऱ्याने स्वतः चा थोडक्यात परिचय समावेश करावा.व्हिडीओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव, शाळा, पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नयेत. व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रिनवर दिसाव्यात.घटक, व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे, हे सुरुवातीला स्क्रिनवर दाखवावे.व्हिडीओ ची लांबी कमीत कमी ५ मि. व जास्तीत जास्त ९ मिनिटांची असावी.

व्हिडीओ फॉरमॅट MP4 असावा.व्हिडीओ मध्ये कुठेही स्वतःच्या समाज माध्यमांची, व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी, उल्लेख नसावा.व्हिडीओ मधील मजकूर व आशयाबाबत पूर्णतः संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे.व्हिडीओ मध्ये वापर करण्यात येणारी इमेज अथवा मजकूर हा कॉपीराईट मुक्त (Creative Commons असण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. कॉपीराईटची लायसन्सच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काळजी घ्यावी. याबाबत काही आक्षेप आल्यास संबंधित स्पर्धक जबाबदार असतील.


🕙प्रस्तुत पुरस्कार दरवर्षी खालीलप्रमाणे कालावधीत आयोजित करुन देण्यात येतील 🕙 📌जाहिरात प्रसिद्धी -मे 📌ऑनलाईन नामांकन नोंदणी -जून 📌तालुका व जिल्हास्तर निवड समितीमार्फत पडताळणी व पुढील टप्प्यासाठी उत्कृष्ट उमेदवारांची शिफारस - जुलै 📌राज्यस्तर निवड समितीमार्फत पडताळणी व अंतिम उत्कृष्ट उमेदवारांची शासनास शिफारस -ऑगस्ट 📌पुरस्कार वितरण समारंभ - सप्टेंबर


🙏 सविस्तर माहितीसाठी -

 शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतांक २०२३०५१११८४८३०४३२१ हा पहावा.


  • धनाजी माने…..✍️

          



Sunday, May 14, 2023

भैरेवाडीचा मोठा वक्ता - छोटा प्रसाद जेव्हा....

 

























दि.१३मे २०२३

भैरेवाडीचा मोठा वक्ता - छोटा प्रसाद जेव्हा......

वेळ दुपारची  , ठिकाण जायंटस् हॉल #आष्टा
' भुमिपुत्रांच्या यशोगाथा '  #पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडीचा पट्टीचा मोठा #वक्ता छोटा प्रसाद संजय जाधव  मुर्ती लहान पण किर्ती महान याची जेव्हा भेट  होते ... खरचं प्रसादच्या सान्निध्यात काही वेळ घालवला की त्यांच्या बुद्धिमत्तेची चुनूक नेमकी समजते.
बोलण्यात पटाईत असणारा. विविध कला- गुणांची देणगी लाभलेला #प्रसाद .
 प्रसादचे 'राजे #छत्रपती शिवाजी महाराज ' यांच्यावरील भाषण ऐकले ..… तेव्हा ते ऐकतच रहावे असे वाटले. त्याचे भाषण ऐकून सारेच प्रभावित  झाले.
विशेषतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय #जयंतराव पाटील साहेब यांनी तर त्याला जवळ घेऊन त्याची मुलाखतच घेतली आणि ते तर हसतमुख होऊन त्याच्याशी बोलतच राहिले.आपल्या व्यस्त कार्यक्रमातही सर्वांनपेक्षा जास्तीत - जास्त वेळ साहेबांनी त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी दिला.त्याची खूप आपुलकीने चौकशी केली.प्रसादने   जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत  अनेक क्रमांक मिळवले आहेत.
                      
 त्याला विज्ञान विषयाचीही खूप आवड आहे. त्याने स्मार्ट #हेल्मेट ,क्लॅप स्वीच अशी वैविध्यपूर्ण उपकरणे शिक्षकांच्या मदतीने स्वतः तयार केली आहेत.
  
८वी मद्धे शिकणारा प्रसाद हा १४ वर्षाचा असला तरी त्याची शारीरिक वाढ वयानुसार झाली नाही नियतीने त्याला या डावात मात्र थोडं मागे ठेवले आहे ,पण....यावर तो हताश न होता  सर्वासमोर हसतमुख राहून  तल्लख बुद्धिमत्तेच्या व बारीक निरीक्षणाच्या जोरावर, आपल्या #वक्तृत्वाने आणि बोलण्याच्या शैलीने सर्वांची मन जिंकतो.
त्याला वाचनाचेही वेड आहे हे त्याच्या पुढील वाक्यावरुन मला जाणवले. त्याने  ' भूमिपुत्रांची #यशोगाथा ' आजच प्रकाशित झालेले #पुस्तक दाखवत तो मला म्हणाला  " या पुस्तकात तुमचाही फोटो आहे , तुम्ही #शिक्षक आहात .... " हे वाक्य ऐकल आणि मी  अचंबितच झालो.🤔
कारण प्रकाशनानंतर त्याने बसल्या- बसल्या
 हे पुस्तक पाहिले असावे. आणि त्यातील त्याने फोटो पाहून चेहरे हेरले होते .त्या पुस्तकातील त्याने काहींच्या यशोगाथा पाहिल्या असाव्यात हे त्याच्या त्या प्रश्नावरून जाणवले.त्याचे हे सुक्ष्म निरीक्षण खरचं अचंबीत करणारे होते.

#राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेब यांनी तर 

"  बेटा ,भविष्यात तुला खूप यश मिळो ! तू खूप -खूप मोठा हो ! तुला असेच यश मिळत राहो !" 
असे आशीर्वाद प्रसाद यास  दिले आणि त्याचा निरोप घेवून साहेब पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

दरम्यान अनेकांनी त्याच्याशी गप्पा मारल्या , सोबत फोटो घेतले.मी ही त्याच्याशी गप्पा मारल्या त्याच्याशी त्या गप्पा तशाच सुरु असाव्यात अस वाटत होत.पण शेवटी त्याचा निरोप घेतला, तो त्याच्या आई- बाबांनसोबत त्याच्या गावी निघून गेला आणि मी माझ्या घराकडे प्रवास सुरु केला.पण तो दिवस बरच काही सांगून गेला. प्रसादची #प्रेरणा आणि त्याच्या आठवणी मनात  रुंजी घालतच राहिल्या.

या आठवणी कुठेतरी नेहमीच स्मरणात राहाव्यात म्हणूनच त्याच्या या आठवणी शब्दबद्ध कराव्या वाटल्या.आपल्या सर्वांनाही त्या वाटाव्या वाटल्या , कारण प्रसाद मला #ग्रेट वाटला , तुम्हालाही नक्की वाटेल.तो कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हालाही भेटला तर जरुर त्याच्याशी गप्पा मारा.त्याच्या त्या गप्पातून  जीवन जगण्यासाठी एक नवी #ऊर्जा मिळाल्याची अनुभूती तुम्हाला ही जानवेल !

एकूणच ...जिद्द व चिकाटीसोबत मनात दुर्दम्य आशावाद असेल तर कोणतीही परिस्थिती  आपल्या मार्गात अडथळा बनू शकत नाही. या जगात अशक्य अस काहीच नाही, हेच  जणू प्रसाद साऱ्यांना दाखवून प्रेरणा देतोय.

तो आपल्या शारीरिक परिस्थितीचे , खुजेपणाचे कधीही #भांडवल न करता , उलट या परिस्थितीमुळेच त्याला झगडण्याची, लढण्याची प्रेरणा मिळतेय. हाच #संदेश तो सर्वाना हसतमुखाने  देत राहतोय असच वाटतं .

खरच प्रसाद जिथे जातो , तिथे सर्वांना जिंकतो.त्याच्या संभाषण चातुर्यासमोर आणि सदैव हसतमुख व्यक्तीमत्वासमोर त्याच शारिरीक खुजेपण हारुन जातं  , तेच त्याचे खुजेपण त्याच्या जिद्दीसमोर खुज होऊन लोळण घेतं आणि प्रसादचे  हेच मोठेपण सर्वांच्या मनावर #रूंजी घालत राहते हे नक्की.

- धनाजी माने.....✍️


बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...