Tuesday, August 30, 2022

गुरुजी ! तुम्हाला लढायला हवं आमच्यासाठी !



 ( मर्यादित शिक्षकांच्या संख्येवरती शिक्षक गेली दहा वर्षे अध्यापनाचे काम करत आहेत. या अध्यापनाच्या कामाबरोबरच निवडणुका, जनगणना, विविध सर्वे ,अशा अनेक अशैक्षणिक कामांना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे .द्वी- शिक्षकी शाळेत तर दोन शिक्षकांवरतीच चार -चार वर्ग शिकवले जात आहेत. सध्या तर अनेक शाळेत हे काम एकच शिक्षक करत आहेत.मग अशा शाळेतील शिक्षकांना दोष देण्यात काय अर्थ? यासाठी यंत्रणेत बदल व्हायला हवा.या क्षेत्रात अनेक समस्या आहेत.

शिक्षक "आम्हाला फक्त शिकू द्या ! "अशी आर्त विनवनी  करत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होऊन, मुख्य दोष दूर न होता ,शिक्षकांना मागीतली जाते शैक्षणिक गुणवत्ता ! तरीही असे शिवधनुष्य पेलून शिक्षक अविरतपणे झटत असून गुणवत्ता टिकवण्याचं काम करत आहेत. ज्या निष्पाप विद्यार्थींनी व त्यांच्या पालकांनी अशा शिक्षकांची व्यथा ,आणि शिक्षक करत असलेले काम जवळून  पाहिलं ते मात्र शिक्षकांची खरी व्यथा जाणतात.हेच या कवितेत मांडल आहे.फक्त वाचू नका चिंतन करा.दिसणं आणि असणं यातला फरक समजूदे शिक्षकांची खरी व्यथा सर्व समाजाला कळूदे !! )

👇🏼 

 ( हे वास्तव जाणून, शिक्षकांना फक्त आणि फक्त अध्यापनाचेच काम द्यायला हव.तरच  शाळेतील मुलांना यापेक्षाही गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळून त्यांना खराखुरा न्याय मिळेल)

आमच गुरुजी .....✍️

गुरुजी आता तुम्हाला लढायला  हवं,

सत्य काय हे साऱ्यांना सांगायला हवं.


अहो मोठ्या -मोठ्या कामांचा तुम्ही,

डोंगर उभा केलाय,मुलांना घडवण्याबरोबरच

लोकवर्गणीसाठी हवा तेवढा वेळ तुम्ही दिलाय,

यातूनच शाळेच्या भौतिक सुविधांचा ,

डोंगर उभा राहिलाय


शिकवणं सोडून , शासनाची प्रत्येक कामं

तुम्ही अगदी विश्वासाने करताय.

निवडणूक असो वा , जणगणना

वर्षभर होणारे उपक्रम असो वा सर्वे

तुम्ही मनापासून करताय.

हे सारं करत, गुणवत्ताही जपताय.


अहो तुमच्या  कामामध्ये  , 

वेळेला बंधनं कुठ  हाय.

Online काम असो वा,

शालेय पोषण आहाराची आकडेवारी.

Gas संपो अगर , भाजीपाला , 

तुम्ही वेळेवर आनताय.


घरच्या प्रपंच्यापेक्षाही,

तुम्ही शाळेचाच प्रपंच्या जपताय

आणि हो ! वर्षातून एक दिवस,

तुमचा ५ सप्टेंबरला बैलपोळा केला जातोय,

बाकी वर्षभर मात्र ,लायकी नसणारा कडून,

 तुमचा अवमानच होतोय.


अहो ज्ञानदानाचे काम सोडून,

तुम्हाला दारुच्या गुत्त्यावरही उभ केलं .

कोरोणात तर तुम्हाला चेकपोस्टवरही ,

रात्रभर उभ केलं.

काहींनी तर आपल जीवही गमावलं

खरच  तुमच्या मान-सन्मानाचा ,

सारा खिमा केलाय.

खरच, गुरुजी तुमच्या सहनशीलतेला ,

आम्ही सलामच  केलायं !


खरच ! शिकवण सोडून गुरुजी ,

तुमच्या इतर कामाचींच यादी मोठी हाय.

'आम्हाला फक्त शिकवू द्या ' ही तुमची,

मागणी  रास्तच हाय.


इतर सारी काम बंद करुन, मायबाप सरकारने

तुमच्या समोर आमची मुलं ,

आणि मुलांसमोर, तुम्हाला ठेवले तर ,

शिक्षणाच्या गुणवत्तेचा इतिहास घडेल.

आमच्या लेकरांच , भविष्य यापेक्षाही उजळेल.


म्हणून गुरुजी आता ही लढाई,

तुम्हाला ,जोमाने लढावी लागेल.

अगदी, ओरडून तुम्हाला बदनाम करणाऱ्यांच्या,

झुंडीकडे दुर्लक्ष करुन.


गरिब माय-बाप आमच्या लेकरासाठी

ही लढाई गुरुजी तुम्हाला लढावीच लागेल !

लढावीच लागेल!!  लढावीच लागेल!!!

- धनाजी माने.....✍️

M - 9403963934




👆🏻  (तुमच्या सगळ्या ग्रुपला गुरुजींची वास्तव्य व्यथा पाठवा.सत्य नेमक काय असत ते थोड तरी समाजात कळूदे,शिक्षकांची व्यथा समजूदे.खरे दोष नेमके कुठे आहेत ❓हे समाजातील सर्वसामान्य लोकांना समजूदेत. फक्त शिक्षकांना त्याचे खरेखुरे शिकवण्याचे काम मिळुदे! गोरगरिबांची मुल यापेक्षाही चांगल शिक्षण मिळण्यासाठी हक्कदार राहुदेत!)











Monday, August 08, 2022

थोडा जागर मांडला आहे.

 








 ( आज सभोवताली समाजात पाहिलं तर ,अनेक क्षेत्रातील लोकांना विविध समस्या आहेत यात शेतकरी,शिक्षक ,पोलीस,व्यावसायिक, विविध क्षेत्रातील खाजगी कर्मचारी अशा अनेक घटकांच्या विविध समस्या आहेत......निसर्गाच्या ल री लाटा माणसाला त्याच्याच चुकानमुळे सहन कराव्या लागत आहे.तरुणाईच्या समस्याही आहेत.

यातील फक्त काही समस्या  मांडण्याचा हा प्रपंच एवढचं........)


   थोडा जागर मांडला  आहे.....✍️


जो तो जगतो आहे आपल्याच कोशात 
आणि आपल्याच विश्वात.
अनेक समस्या आणि दुःख आहेत,
माणसामाणसात आणि समाजात , 
कुणालाच कुणाच देणंघेणं उरल नाही.
जो तो दंग आहे ,आपलाच कोश घट्ट विणण्यात.

शेतकरी असो वा शिक्षक,
पोलीस असो वा पूरग्रस्त
असे सारेच आहेत समस्याग्रस्त .
 

वाट्याला यावेत चार दिवस सुखाचे,
आपल्याबरोबरच,आपल्या मुलाचे.
आणि पिढ्यानपिढ्या वाढलेला,
कर्जाचा डोंगर कमी  होऊन ,
शांत झोप लागावी यासाठी ,
 लढाई आजूनही सुरूच आहे बळीराजाची.

तो समस्यांचा पाढा बोंबलून पाहतो,
दारे ठोठावून पाहतो,
तरी त्याच्या समस्या कधी सुटल्याच नाही.
कधी त्याने स्वतःला दोरीत लटकवूनही घेतले.
तरीही त्याचे प्रश्न ,  कधी नाही सुटले।

चार दिवस त्याच्या मरण्याचे अन्,
सांत्वनाचे फोटोसेशन झाले.........
पुढच्या पिढीच्या वाट्याला मात्र,
बाप गेल्याचे आणि बोंबलून- बोंबलून
हात गेल्याचे दुःखच वाट्याला आले.

तरीही सारेच कसे मशगुल आहेत ...
आपल्याच कोशात आणि आपल्याच विश्वात !


शिक्षक सुद्धा आंदोलन करत,
रस्त्यावर उतरतात.
आम्हाला 'फक्त शिकऊ द्या ! '
म्हणत लढाई- लढत राहतात.
ना पदांची भरती होत आहे ,
ना अतिरिक्त कामाचा ताण .
सारे असे आलबेल सुरु आहे.

शिक्षकांच्या बदनामीचे
षडयंत्र सुरुच आहे .
शिकवण सोडून,इतर कामातच,
गुरुजींना गुंतुन ठेवलं जातयं.
गोरगरिबांच्या शिक्षणाचा,
खेळखंडोबा मात्र सुरुच आहे.

सारेच कसे झोपलेत की,
झोपेचे सोंग घेतलयं कळत नाही.
वाडी- वस्तीवरील मुलांच्या,
शिक्षणाची हेळसांड 
भरतीविना  सुरूच आहे.
तरीही सारेच मशगुल आहेत आपल्याच 
कोशात आणि आपल्याच विश्वात.......

ज्यांनी कोरोणाच्या काळात ,
देवदूत म्हणून काम पाहिलं.
ते पोलीस तर कुठे ,
समस्यान पासून दूर आहेत ?
अतिरिक्त कामाच्या ताणाने तेही पुरे पिचलेत.

चार क्षण आपल्या लेकरा-बाळांच्यात असावेत,
गोरगरीब दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी ,
आपलेही दिवस खर्ची पडावेत
यासाठी तेही खूप आतुरलेत .....

समाजात फिरा ,नाहीतर रस्त्यावर फिरा.
समस्यांचे खड्डे काही मुजत नाहीत.
तरुणांच्या पिढ्या कामाविना भटकत आहेत.
व्यसनांच्या जंजाळात मात्र , ते अडकत आहेत.

कधी अवेळी पाऊस पडतो आहे.
तर कधी दुष्काळही पडतो आहे.
विकासाच्या नावाखाली , 
निसर्गावर अतिक्रमण सुरु आहे.

समस्यांच्या पाढ्यांचा ,
हा पाढा ........
न संपणारा असला तरी ,
समस्यांचा हा .....थोडा जागर मांडला आहे एवढचं.
 
- धनाजी माने.....✍️
dhanajimane.blogspot.com

बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...