Monday, April 25, 2022

जिल्हा अंतर्गत बदली नवीन धोरणामध्ये विशेष संवर्ग भाग दोन चे निकष

 


विशेष संवर्ग भाग दोन चे निकष


जिल्हा अंतर्गत बदली नवीन धोरणामध्ये विशेष संवर्ग भाग २ हा तयार करण्यात आला आहे. जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.
1.9 संवर्ग 2 चे निकष व प्राधान्यक्रम
1.9.1 पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी
असतील तर
1.9.2 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर
1.9.3 पती-पत्नी दोघेही एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर 1.9.4 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदा. महानगरपालिका / नगरपालिका
1.9.5 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक
उपक्रमातील कर्मचारी 1.9.6 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक/ कर्मचारी असेल तर
4.3 संवर्ग 2 ची बदली प्रक्रिया व कार्यपद्धती (टप्पा क्र. 3 )4.3.1 टप्पा क्रमांक दोन प्रमाणे ( संवर्ग १ च्या बदल्या) ( कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल, तद्नंतर विशेष संवर्ग भाग-2 यांच्या बद करण्यात याव्यात.4.3.2 जे शिक्षक विशेष संवर्ग भाग दोन मध्ये मोडतात. त्यांना विवरण पत्र क्रमांक चार मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.4.3.3 जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल.4.3.4 उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर नमूद केलेल्या कार्य पद्धती लागू होतील. या तरतुदीप्रमाणे संबंधितांची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक युनिट म्हणून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा 30 किमी परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यायचे आहे. यापैकी एकाची पण दहा वर्षे •सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल.
4.3.5 तीस किलोमीटर रस्त्यांची अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदर चे 30 किमी रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील.
4.3.6 विशेष संवर्ग दोन च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.


Saturday, April 23, 2022

जनता म्हणते...भोंगे काढून किंवा चालीसा म्हणून....


 


जनता म्हणते.......


#नेते आणि #राज्यकर्ते हवेत,

माझ्या #शाहू -फुले....

#आंबेडकरान सारखे आणि

#छत्रपती शिवबान सारखे


नकोत नुसतेच एक - दुसऱ्यावर ,

ओरडून तेढ निर्माण करणारे.

#मना-मनात आणि #जाती-धर्मात

#भिंती घालून ,आपली #पोळी भाजणारे.


घ्यावेत #आदर्श थोडेतरी #शिवछत्रपतींचे,

अठरा #पगड जातींना एकत्र बांधण्याचे.

व्हावे त्यांच्याच सारखे #रयतेचे राजे ,

रयतेसाठी #जगणारे ,आणि रयतेसाठीच #मरणारे.


असे नेते नको आहेत जनतेला,

#भेदाभेद निर्माण करून,

 #सुरुंग लावतात ऐक्याला.

#संघर्ष माजवून,खतपाणी घालतात #दुहीला


संघर्ष जरूर असावा ....

तो बाबासाहेबांनी सांगितलेला,

#शिका, #संघटीत व्हा ! आणि #लढा!

या पावलावर #पाऊल टाकणारा


#जनता म्हणते  नेते हवेत असे आम्हाला.

मंदिरातील देवाइतकेच, #अल्लालाही माणणारे.

आणि........

मशीदीतील #अल्लाप्रेमी, #चालीशात #रमणारे.


लोक म्हणतात नेत्यांनी,

जरूर ओढावेत #आसूड,

#महात्मा फुल्यांच्या आसूडांनसारखे,

चुकीच्या परंपरांनवर #प्रहार करणारे.


आहो , #भोंगे काढून किंवा #चालीसा म्हणून,

जनता कधीच सुखी होणार नाही.

#शाहू राजांनसारखी , रयतेची काळजी केल्याशिवाय,

#सर्वसामान्य ,#गोरगरीब #सुखी कधीच होणार नाही.

- #धनाजी माने ....✍️

9403963934

dhanajimane123@gmail.com
























बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...