Saturday, August 10, 2024

वास्तव......




 

वास्तव....

वर्षे ७५ होऊन गेली ,
#स्वातंत्र्य मिळून देशाला
समस्या अजूनही त्याच आहेत,
सर्वांच्याच वाट्याला.


रस्त्यावरून जाताना ,
#खड्डे अजूनही तसेच आहेत .
#पैसे मात्र रस्त्यांवरती ,
भरमसाठ #खर्च झाले आहेत.


तरुणांचे लोंढेच्या -लोंढे ,
शिकून बाहेर पडत आहेत .
नोकऱ्यांचे प्रश्न मात्र ,
आवासून उभे आहेत.


बळीराजाने केले कितीही #कष्ट ,
तो ,आहे  तिथेच आहे .
शेतीमालाच्या योग्य भावासाठी ,
#लढा त्याचा  सुरुच आहे.


#पाऊस बरसतो , #पूर येतो ,
पाण्याचा प्रश्न निर्माण होतो ,
#पूरग्रस्तांच्या समस्यांचा #पाढा ,
आहे तसाच सुरु आहे.


नोकरीमद्धेही #घोटाळे,सुरुच आहेत.
चुकीचे दाखले जोडून ,
खरे -खुरे #लाभार्थी ,
बाजूला फेकले जात आहेत.


नोकरीवरती #पोट ज्याचे ,
तोही अजून लढतोच आहे.
#जुन्या - पेन्शनसाठी ,
त्याचाही #आक्रोश सुरु आहे.


राजकारणात राजकारण्यांची ,
स्पर्धा मोठी सुरु आहे .
विकासावरती बोलण्यापेक्षा ,
टिका -टिप्पणीच सुरु आहे.


समस्यांचे गुंते ... वाढत चाललेत,
चार दिवस सुखाचे ,
नशीबी आपल्या यावेत ,
याच  प्रतिक्षेत सारे आहेत.

- धनाजी माने...✍️


बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...