Wednesday, August 09, 2023

बापमाणूस...

 


बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


बाप माझा शेतामध्ये राबराब राबायचा ,

उन्ह-पावसात ,थंडी -वाऱ्यात....

तो  सार  सोसायचा.

फाटक्या संसाराला ठिगळ लावण्यात,

तो सारा खपायचा.

दु:ख सार उरात दाबून, हसत-हसत

सार काही आमच्यासाठी  करायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


वर- वर तो नेहमी हसत दिसायचा ,

आत मात्र गरीबीने पुरा फाटलेला असायचा.

लागलं काही संसाराला , लगेच आणून दयायचा

एक-दोन घास स्वतः कमी खायचा,

आम्हाला मात्र तो, पोटभरुन  द्यायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


सणासुदीला गोड-धोड , कमी पडू नाही द्यायचा.

दिवाळी असो वा पाडवा , कपडे तो साऱ्यांना आणायचा.

स्वतःच  मात्र फाटक दंडक, तो तसाच झाकून ठेवायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


आईसाठी कवितेच्या ,कविंच्या मैफली व्हायच्या .

आई दुधावरची साय असते.वासराची गाय असते ,

साहित्यात आईचाच प्रभाव अधिक असायचा.

ढालीसारखे वार झेलणारा ,

सुपाएवढ्या काळजाचा

बाप माझा , तिथही दुर्मिळच असायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


- धनाजी माने....✍️

dhanajimane.blogspot.com


Sunday, August 06, 2023

राजं परतं तुम्हाला याव लागणारं.....


 


राजं परत तुम्हाला याव लागणार,

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

तुम्ही  रयतेचं राजे होता ,
सारा कसा आनंदी आनंद होता,
राजे जरी असला तुम्ही
जनतेत मनापासून मिसळत होता.

आता असे काही उरले नाही .
नवे नेते ,नवे कायदे आले तरी.
रयतं काही सुखी झालीच नाही.
म्हणूनच.......                           

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

तुम्ही कशी सगळ्यांची ,
मोठ बांधली होती.
अठरा पगड जातीची माणसं कशी ,
गुण्यागोविंदाने राहत होती.

आता राज इथं अस घडत नाही,
जाती-जातीत  धर्मा-धर्मात,कलह सुरु आहेत.
तसे घरा-घरात , गल्ली- बोळात तेढ सुरु आहे.
गटा-गटाने आणि वार्ड कमेटीने ही जंग चालू आहे.
म्हणून.....

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

तुमच्या सोबत तेव्हा ,
जीवाभावाचे एकनिष्ठ मावळे होते.
जीवाची बाजी लावणारे ,बाजी होते.
रयतेच्या सुखासाठी प्राणाचे बलिदान देत होते.

आता राज इथ अस काही उरल नाही.
विश्वासू , निष्ठावानांची वानवा आहे.
इकडून- तिकडे पळणारांची आणि पळवणारांची
स्पर्धा इथे सुरु आहे.
म्हणून......

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

राज तुमच्या काळात ,लगेच न्याय मिळायचा.
आया-बहिनीनकडे वाकडी नजर करणारांचा,
आणि भ्रष्टाचाऱ्यांचा  तुम्ही कडेलोट करायचा.

राज  जनतेला आता न्यायासाठी,
वर्षानुवर्षे लढाव लागतयं.
रोज नव्या गुन्ह्यांचे आणि भ्रष्टाचाराचे,
पेव इथ फुटलयं, मन कस खिन्न झालयं !
म्हणूनच म्हणतोयं , हात जोडून विनवणी करतोयं......

राजं परत तुम्हाला याव लागतयं..
राजं परत तुम्हाला याव लागतयं...
राजं परत तुम्हाला याव लागतयं.......

- धनाजी माने....✍️
dhanajimane.blogspot.com


बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...