'पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे
धनाजी माने दि.२६ - मार्च महिना आला की या परिसरातील लोकांना आठवण होते ती येडेनिपाणीच्या ' पद्मविभूषण वसंत व्याख्यानमालेची '...
मार्च महिन्याच्या सुरुवातीला येडेनिपाणी (ता.वाळवा) या पी.सावळाराम यांच्या नगरीत आसमंतात एक सुखद गारवा भरून राहिलेला असतो. अशा या उल्हासित वातावरणात येडेनिपाणी येथील संस्कार मंदिराजवळील बाजारपेठेचे मैदान दि.१ मार्च ते ५ मार्च, सायंकाळी ७ ते रात्री ९ श्रोत्यांच्या उपस्थितीने फुलून गेलेले असते. पाच दिवस श्रवणभक्तीची आस असलेले या परिसरातील श्रोते ज्ञानरसांच्या तुषारात अक्षरशः न्हाऊन निघतात.
येडेनिपाणी येथील जय किसान तरुण मंडळाची ‘पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला’ म्हणजे गेली ३५ वर्ष अविरतपणे चाललेला एक ज्ञानयज्ञ.जवळ जवळ तीसऱ्या तपाच्या अंतिम टप्प्यात असणारी ही व्याख्यानमाला १ मार्च पासून सुरु होते आहे.
या ज्ञानयज्ञातून या गावातील ,परिसरातील अनेक पिढ्या वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाल्या. अक्षय विचारांचे समृद्ध धन मुक्तपणे या व्यासपीठाद्वारे समाजात संक्रमित झाले. विविध विषयातील अभ्यासकांनी श्रोत्यांचं अवघं विचारविश्व ढवळून काढलं. श्रवणभक्तीतील तल्लीनता काय असते याची प्रचिती या व्याख्यानमालेस उपस्थित राहिल्यावरच अनुभवायला मिळते. महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांनी आपल्या ज्ञानाचे भांडार येथे रिते केले. व्याख्यानमालेने आपल्या या दीर्घ प्रवासात श्रोत्यांना अक्षरशः घडवले आहे. आजच्या बदलत्या अभिरूचीच्या जगात विचारांचा हा जागर अखंडपणे सुरु ठेवणं हे देखील एक आव्हान आहे. आणि हे शक्य झालं आहे ते मंडळाच्या निस्पृह कार्यकर्त्यांमुळे.
जय किसान मंडळाचे संस्थापक माननीय आनंदराव पाटील (काका)अध्यक्ष प्रा.डॉ. दीपक स्वामी, संयोजक शंकर पाटील ,सचिव कालिदास पाटील ,सहसंयोजक प्रा.स्वप्निल पाटील यांच्याबरोबरच या व्याख्यानमालेसाठी बाळकृष्ण पाटील, सचिन शेवाळे, शिवानंद माळी, कविता पाटील, जयश्री पाटील ,हिंदुराव रसाळ ,शरद घाडगे, मयूर थोरात, अरुण पाटील, विद्याराणी शेवाळे ,विजय पाटील, नंदकुमार बनसोडे ,जयसिंग पाटील ,कुंडलिक कोळी, अर्जुन थोरात, धोंडीराम पाटील ,दिनकर पाटील, सतीश पाटील ,शंकर गोपाळ पाटील, सतीश कांबळे, प्रा.संजय थोरात हे सर्वजण निस्पृह भावनेने हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू राहावा या प्रामाणिक भावनेने यासाठी झटत असतात.
संस्थापक आनंदराव पाटील ( काका) व प्रा.डॉ. दीपक स्वामी यांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षाला असाच बहर येत राहो याच साऱ्या शुभेच्छा !
♨️ ३५ व्या व्याख्यानमालेचे उद्घाटन -
१ मार्च रोजी जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील-साखराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
♨️ २०२४-या वर्षीचे व्याख्यानमालेतील वक्ते आणि विषय ⤵️
,🎤 १ मार्च -इतिहास संशोधक प्रा. अरुण घोडके इस्लामपूर यांचे 'असे होते शिवशंभू संभाजीराजे'
🎤 २ मार्च- 'संस्कार : काळाची गरज' या विषयावर प्रा. डॉ. शोभा लोहार (सातारा)
🎤 ३ मार्च- 'घराचे घरपण... गावाचं गावपण टिकवूया' या विषयावर ज्येष्ठ पत्रकार दत्ता थोरे ( सोलापूर)
🎤 ४ मार्च - 'कविता नात्या-गोत्याच्या' अरुण पवार (परळी वैजनाथ)
🎤 दि. ५ मार्च - 'लोकशाहीच्या प्रवासाची दिशा व सद्य:स्थिती' या विषयावर विधी तज्ज्ञ व संविधान विश्लेषक असीम सरोदे (पुणे) यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सांगता होणार आहे.
⏰वेळ - दररोज सायंकाळी -७ वा.
💢 ठिकाण - संस्कार मंदिरा जवळील मैदान , येडेनिपाणी
- धनाजी माने....✍️
Ⓜ️ 9403963934
dhanajimane.blogspot.com
http://dhunt.in/T6MoQ