Sunday, February 25, 2024

पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे

 




'पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे


धनाजी माने दि.२६  - मार्च महिना आला की या परिसरातील लोकांना आठवण होते ती येडेनिपाणीच्या ' पद्मविभूषण वसंत व्याख्यानमालेची '...

मार्च महिन्याच्या सुरुवातीला येडेनिपाणी (ता.वाळवा) या पी.सावळाराम यांच्या नगरीत  आसमंतात एक सुखद गारवा भरून राहिलेला असतो. अशा या उल्हासित वातावरणात येडेनिपाणी येथील संस्कार मंदिराजवळील बाजारपेठेचे मैदान दि.१ मार्च ते ५ मार्च, सायंकाळी ७ ते रात्री ९ श्रोत्यांच्या उपस्थितीने फुलून गेलेले असते. पाच दिवस श्रवणभक्तीची आस असलेले या परिसरातील श्रोते ज्ञानरसांच्या तुषारात अक्षरशः न्हाऊन निघतात. 

येडेनिपाणी येथील जय किसान तरुण मंडळाची ‘पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला’ म्हणजे गेली ३५ वर्ष अविरतपणे चाललेला एक ज्ञानयज्ञ.जवळ जवळ तीसऱ्या तपाच्या अंतिम टप्प्यात असणारी ही व्याख्यानमाला १ मार्च पासून सुरु होते आहे.

 या ज्ञानयज्ञातून या गावातील ,परिसरातील अनेक पिढ्या वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाल्या. अक्षय विचारांचे समृद्ध धन मुक्तपणे या व्यासपीठाद्वारे समाजात संक्रमित झाले. विविध विषयातील अभ्यासकांनी श्रोत्यांचं अवघं विचारविश्व ढवळून काढलं. श्रवणभक्तीतील तल्लीनता काय असते याची प्रचिती या व्याख्यानमालेस उपस्थित राहिल्यावरच अनुभवायला मिळते. महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांनी आपल्या ज्ञानाचे भांडार येथे रिते केले. व्याख्यानमालेने आपल्या या दीर्घ प्रवासात श्रोत्यांना अक्षरशः घडवले आहे. आजच्या बदलत्या अभिरूचीच्या जगात विचारांचा हा जागर अखंडपणे सुरु ठेवणं हे देखील एक आव्हान आहे. आणि हे शक्य झालं आहे ते मंडळाच्या निस्पृह कार्यकर्त्यांमुळे.

जय किसान मंडळाचे संस्थापक माननीय आनंदराव पाटील (काका)अध्यक्ष प्रा.डॉ. दीपक स्वामी, संयोजक शंकर पाटील ,सचिव कालिदास पाटील ,सहसंयोजक प्रा.स्वप्निल पाटील यांच्याबरोबरच या व्याख्यानमालेसाठी बाळकृष्ण पाटील, सचिन शेवाळे, शिवानंद माळी, कविता पाटील, जयश्री पाटील ,हिंदुराव रसाळ ,शरद घाडगे, मयूर थोरात, अरुण पाटील, विद्याराणी शेवाळे ,विजय पाटील, नंदकुमार बनसोडे ,जयसिंग पाटील ,कुंडलिक कोळी, अर्जुन थोरात, धोंडीराम पाटील ,दिनकर पाटील, सतीश पाटील ,शंकर गोपाळ पाटील, सतीश कांबळे, प्रा.संजय थोरात हे सर्वजण निस्पृह भावनेने हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू राहावा या प्रामाणिक भावनेने यासाठी झटत असतात.

संस्थापक आनंदराव पाटील ( काका) व प्रा.डॉ. दीपक स्वामी यांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. या  वटवृक्षाला असाच बहर येत राहो याच साऱ्या शुभेच्छा !

♨️ ३५ व्या व्याख्यानमालेचे उद्घाटन -

१ मार्च रोजी जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील-साखराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

♨️ २०२४-या वर्षीचे व्याख्यानमालेतील वक्ते आणि विषय ⤵️

,🎤 १ मार्च -इतिहास संशोधक प्रा. अरुण घोडके इस्लामपूर यांचे 'असे होते शिवशंभू संभाजीराजे' 

 🎤 २ मार्च- 'संस्कार : काळाची गरज' या विषयावर प्रा. डॉ. शोभा लोहार (सातारा) 

 🎤 ३ मार्च-  'घराचे घरपण... गावाचं गावपण टिकवूया' या विषयावर ज्येष्ठ पत्रकार दत्ता थोरे ( सोलापूर)

🎤  ४ मार्च - 'कविता नात्या-गोत्याच्या' अरुण पवार (परळी वैजनाथ) 

🎤 दि. ५ मार्च - 'लोकशाहीच्या प्रवासाची दिशा व सद्य:स्थिती' या विषयावर विधी तज्ज्ञ व संविधान विश्लेषक असीम सरोदे (पुणे) यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सांगता होणार आहे.

वेळ - दररोज सायंकाळी -७ वा.

💢  ठिकाण - संस्कार मंदिरा जवळील मैदान , येडेनिपाणी


- धनाजी माने....✍️

Ⓜ️ 9403963934

dhanajimane.blogspot.com

http://dhunt.in/T6MoQ



 

आगळा वेगळा लग्नसोहळा....

 


शिवविवाह सोहळा ...मोरे -कारंडे कुटूंबियांचा.....

छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्या जयघोषात रविवारी एक विवाह सोहळा पार पडला

 ' शिवविवाह सोहळा 'जो मी आयुष्यात या भागातील हा लग्नसोहळा पहिल्यांदाच अनुभवला आणि उपस्थित असणाऱ्या या परिसरातील लोकांनाही हा असा विवाह सोहळा पाहिल्यांदाच  पाहण्याचा दुर्मिळ योग आला असावा.

आपण आजपर्यंत जे अनेक विवाह सोहळे पाहिले ते विविध कर्मकांडामद्धे अडकलेले विवाह सोहळे पाहिले.

 यामध्ये  अंगावर हळद लावणे / ओतणे , अक्षताच्या नावाखाली वधू- वरांवरती अक्षता टाकणे भटजीला  तांदूळ मारणे . विषारी फोमचे स्प्रे मारणे .पारंपरिक मंगलाष्टका म्हणने ,होम हवन ,सप्तपदी अशा वातावरणात पार पडणारे विवाह आजपर्यंतआपण पाहिले,आणि पाहत आलो आहोत.

पण या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन , एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणारा ,चांगल्या संस्काराचे समाजात रोपन करणारा एक आगळावेगळा ' शिवविवाह सोहळा ' याची देही याची डोळा मी या परिसरात आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला.

पुणे-बेंगलोर हायवे जवळील इंदिरा पॅलेस या ठिकाणी  त्याचे साक्षीदार होता आले. 

खऱ्या अर्थाने दोन कुटुंबांना एकत्र आणणारा आनंद सोहळा असे त्या विवाहाचे स्वरूप होते. त्यामध्ये पारंपरिक काव्याक्षता नव्हत्या की वधु-वरावरती अक्षता टाकने नव्हते.पारंपरिक मंगलाष्टका म्हणने नव्हते. तर...

शिवविवाह पद्धतीच्या रचलेल्या आणि विवाहाचा त्यातील बंधनांचा अर्थ सांगणाऱ्या काव्याक्षता होत्या. 

व्यासपीठावरुन आपण ज्यांचा इतिहास सांगतो , वैचारिक वारसा सांगतो त्या  जिजाऊमाता ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. 

निमित्त होत शिवश्री इंजिनिअर  विक्रांत व शिवमती इंजिनिअर सोनल यांच्या विवाह सोहळ्याचे.

हा विवाह सोहळा होता ,या परिसरातील अभियंते महेश मोरे यांच्या मुलाचा तर उद्योजक जयंत मोरे यांच्या पुतण्याचा हा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील कोपार्डे येथील कारंडे कुटुंबातील वधु सोनल यांच्याशी पार पडला.

आदरणीय स्व.संपतराव मोरे व आदरणीय माई या प्राथमिक शिक्षक दांपत्यांच्या पोटी ... वर पिता महेश मोरे यांचा जन्म, त्यांच्या संस्काराची शिदोरी ते आजपर्यंत जपत आले आणि त्या संस्कारांच्या जडणघडणीतून घडलेल्या संस्काराचे संस्कारक्षम फलित म्हणजे हा विवाह सोहळा होता असेच म्हणावे लागेल !

या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होताना एक वेगळाच आनंद देणारा अनुभव येत होता. क्षणाक्षणाला घडणाऱ्या विवाह सोहळ्यातील प्रसंगाने, उपस्थितांच्या मनावर विधायक संस्कारांची पेरणी होत होती.

 तुतारीच्या रोमांचकारी वाद्यांच्या गजरात राजमाता जिजाऊ आणि छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नव वधूवरांनी हार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांच्या नवाचा  जयघोष झाला ! .....चैतन्याचा, आनंदाला भरते आनणारा  सोहळा या पहिल्याच प्रसंगाने सुरु झाला.

' जिजाऊ माऊली घे...  ही तुला वंदना....जय जय जिजाऊ ......च्या स्वरात जिजाऊ वंदना पार पडली.

इतिहासातील या महान व्यंक्तिच्या मानवंदनेनंतर....

ज्यांनी या वधू-वरांना इथपर्यंत पोहचवण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले ,संस्कारीत केले त्या कुटुंबातील व्यक्तीचा सन्मान केला गेला.

प्रथम मान मुलीकडच्या नातेवाईकांना देण्यात आला.मुलीचे आजी -आजोबा, आई -वडिल चुलते - चुलती ,भाऊ, बहिण दाजी यानंतर

मुलाचे आजी -आजोबा, आई -वडिल, चुलते - चुलती भाऊ, बहिण दाजी या सर्वांची ओळख उपस्थित हजारो समुदायाला करुन दिली.पुष्प गुच्छ देऊन नातेवाईक यांचा सत्कार करण्यात आला.

वधू- वर सोनल - विक्रांत यांनी वृक्षाला, तुळशी मातेला पाणी घातले , ज्या निसर्गाने आपले पालन पोषण केले त्याचे जणू ऋणच या प्रसंगातून व्यक्त केले.

यानंतर .....।

वधू -वर यांनी एकदुसऱ्याला हार घालत ते विवाहबंधनात बंधित झाले.तसे तुतारींचा आवाज आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.....

वधू- वरांनी उपस्थितांच्या साक्षीने एक दुसऱ्याचा स्वइच्छेने स्वीकार केल्याची व आयुष्याच्या एखाद्या वळणावर मतभेद झाले तर ते समंजसपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करु व यातूनही नाहीच मिटले मतभेद तर परस्परांशी कसलीही बाधा येणार नाही याची काळजी घेत बाजूला होऊ अशी सर्वांच्या साक्षीने जाहीर शपथ घेतली.... वराने - वधूला मंगळसूत्र घातले.....

आणि शिवसप्तकाला सुरुवात झाली.....

' वंदा...जिजाऊ ,शहाजी या महान व्यक्तींची जरित्रे जपा ....शिवमंगल सत्यध्यान .....(टाळ्या)

या सप्तकाच्या माध्यमातून

सासू -सासरे ,काका ,ननंद ,भावजय ही नाती जपण्याचा...सामाजिकभान ,कर्तव्य करताना चुकू नये.विद्या घेताना विज्ञान व खेळ हेही जपा.व्यसनाधीन होऊ नका.शिवाजींचा आदर्श जपून कर्तृत्व करा....दोघांची हृदये प्रसन्न ठेवा....असे संदेश दिले.

झाले शिवमंगलम्  या वाक्याने शिवसप्तक संपले .......टाळ्या झाल्या

वधू व वरांना शिवविवाह दाखला देण्यात आला व वाचन करण्यात आले .......

शिवधर्मपीठ, मातृतीर्थ, सिंदखेड राजा

|| शिवविवाह दाखला ।।

शिवमती सोनल.......आणि शिवश्री विक्रांत यांचा

|| शिवविवाह ।।

शिवशक ३५० रविवार दि. २५/०२/२०१४ रोजी इंदिरा पॅलेस पुणे-बेंगलोर हायवे, वाघवाडी फाटा येथे संपन्न झाला. दाखल्यावरती नव वधु - वरांच्या सह्या घेतल्या गेल्या आणि हा आगळा - वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला.

एकूणच खऱ्या अर्थाने दोन कुटुंबांना एकत्र आणणारा हा आनंद सोहळा , अगदी शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. अशा या मोरे-कारंडे यांच्या विवाह सोहळ्यातून अनेक चांगले संदेश समाजापर्यंत जातील हे नक्की !

धन्यवाद मोरे आणि कारंडे कुटुंबीयांना त्यांनी अशा विधायक सोहळ्याचे साक्षीदार बनण्याचा योग आनला !

- धनाजी माने......✍️

Ⓜ️9403963934

पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे

  'पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे धनाजी माने दि.२६  - मार्च महिना आला की या परिसरातील लोकांना आठवण होते ती येडेनिपाणीच...